- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती.त्यानुसार राज्य सरकारने मुद्रांक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यामुळे आजपासून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करून महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टॅम्प जारी केले जातील.त्यामुळे,आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री लागणार आहे.
सर्वसाधारणपणे जिथे १०० रुपये लागत होते तिथे आता ५०० रुपये द्यावे लागणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला चालू वर्षात सुमारे ६० हजार कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गेल्या वर्षी या विभागाने राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती.मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा मोठा स्त्रोत जरी असला,तरी लाडक्या बहिणींना दीड हजार दिले.परंतु त्याच बहिणीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जाणार आहे.आतापर्यंत नोटरीचा साधा स्टॅम्प १०० रुपयांना मिळत होता.आता तो ५०० रुपयांना मिळणार आहे.बहिणीला दिलेली रक्कम भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत.
- Advertisement -

