Tuesday, March 18, 2025
Homeनागपूरअन् मृत्यूनंतर सुटला निर्दोष; तीन हजाराची घेतली होती लाच....
spot_img

अन् मृत्यूनंतर सुटला निर्दोष; तीन हजाराची घेतली होती लाच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- लाचलुचपत प्रकरणात आरोपी असणारे एक सहकार अधिकारी मृत्यूनंतर निर्दोष ठरले.संबंधित अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी यासंदर्भातील न्यायालयीन लढा लढला.

बाबाराव श्यामराव विटाळकर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते सावनेर येथे सहायक उपनिबंधक (सहकारी संस्था) होते.त्यांनी सावकारीचे लायसन्स देण्यासाठी तीन हजार रुपये मागितले; अशी तक्रार पवन जयस्वाल यांनी २५ जुलै १९९४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून विटाळकर यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर २८ फेब्रुवारी २००५ रोजी विशेष सत्र न्यायालयाने विटाळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच एकूण तीन हजार रुपये दंड ठोठावला.त्या निर्णयाविरुद्ध विटाळकर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.ते अपील प्रलंबित असताना विटाळकर यांचा मृत्यू झाला.परिणामी त्यांच्या वारसदारांनी ते अपील पुढे चालविले.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी अंतिम सुनावणीनंतर विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ते अपील मंजूर करून विटाळकर यांना निर्दोष ठरविले व सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला. अपीलकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड.अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!