Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरअन् मृत्यूनंतर सुटला निर्दोष; तीन हजाराची घेतली होती लाच....

अन् मृत्यूनंतर सुटला निर्दोष; तीन हजाराची घेतली होती लाच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- लाचलुचपत प्रकरणात आरोपी असणारे एक सहकार अधिकारी मृत्यूनंतर निर्दोष ठरले.संबंधित अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी यासंदर्भातील न्यायालयीन लढा लढला.

बाबाराव श्यामराव विटाळकर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते सावनेर येथे सहायक उपनिबंधक (सहकारी संस्था) होते.त्यांनी सावकारीचे लायसन्स देण्यासाठी तीन हजार रुपये मागितले; अशी तक्रार पवन जयस्वाल यांनी २५ जुलै १९९४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून विटाळकर यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर २८ फेब्रुवारी २००५ रोजी विशेष सत्र न्यायालयाने विटाळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच एकूण तीन हजार रुपये दंड ठोठावला.त्या निर्णयाविरुद्ध विटाळकर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.ते अपील प्रलंबित असताना विटाळकर यांचा मृत्यू झाला.परिणामी त्यांच्या वारसदारांनी ते अपील पुढे चालविले.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी अंतिम सुनावणीनंतर विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ते अपील मंजूर करून विटाळकर यांना निर्दोष ठरविले व सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला. अपीलकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड.अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!