Thursday, January 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त...अन्यथा पीएम किसान योजनेचे दोन हजार विसरा..!

…अन्यथा पीएम किसान योजनेचे दोन हजार विसरा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी समान तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आणि आधार व्हेरिफिकेशन आवश्यक होते.मात्र,आता केंद्र सरकारने ‘फार्मर आयडी’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करून नवा नियम लागू केला आहे. गेल्या काही वर्षांत पीएम किसान योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतांना काही ठिकाणी गंभीर गैरप्रकार आढळले.चुकीची नोंदणी,चुकीची कागदपत्रे, बँक खात्यातील त्रुटी आणि बोगस लाभार्थी यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले.काही प्रकरणात तर शेतकरी नसलेली माणसेही योजनेचा हप्ता घेत असल्याचे समोर आले.त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ हा मुख्य उपाय म्हणून सरकारने पुढे आणला आहे.यामुळे योजना अधिक पारदर्शक होणार असून बनावट लाभार्थ्यांवर मोठी कारवाई होणार आहे. त्यामुळे ‘फार्मर आयडी’ नोंदविल्याशिवाय आगामी हप्ते बँक खात्यात जमा होणार नाहीत.म्हणजेच ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांना लवकरात लवकर आयडी बनवावी लागेल.आतापर्यंत पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा करण्यात आले आहेत.तत्पूर्वी  २२ व्या हप्त्यापूर्वी ही नवीन अट लागू होत आहे.फार्मर आयडी लागू झाल्यानंतर शेतकरी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडला जाईल.त्याला त्याच्या नावावर कोणत्या योजना चालू आहेत,किती अनुदान मिळाले आहे,विमा किती मिळाला,पीक कर्जाची स्थिती काय आहे,याची माहिती एका क्लिकवर समजू शकेल. त्यामुळे त्याची फसवणूक होणार नाही आणि कोणतीही रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात जाण्याचा धोका कमी होईल.पीएम किसान योजनेत ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केल्याने केंद्र सरकारने बोगस लाभार्थ्यांना एकप्रकारे मोठा झटका दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!