Friday, May 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त..अन्यथा पीएम किसानचा लाभ होणार बंद; ३० जून शेवटची तारीख..

..अन्यथा पीएम किसानचा लाभ होणार बंद; ३० जून शेवटची तारीख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास पात्र लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणे बंद होऊ शकतात.त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी तात्काळ विहित मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी.यासाठी शासनाने येत्या,३० जून २०२६ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे; अन्यथा विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा,हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी शेतकरी नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊ शकतात.तसेच,शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून चेहऱ्याद्वारे(फेस ऑथेंटिकेशन) ई-केवायसी पूर्ण करू शकतील.पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी,असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!