- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर तर संपूर्ण देशात गैरव्यवहार तथा भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.काही अधिकारी,कर्मचारी पदाचा दुरुपयोग करून जास्तीत- जास्त वरच्या कमाईकडे लक्ष घालू लागलेत.असा कोणताही क्षेत्र सुटलेला नाही की,ज्यात वरच्या कमाई शिवाय कामेच होत नाहीत.अश्यातच गडचिरोली तालुक्याच्या अडपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांनी ग्रामपंचायतीत कार्यरत असतांना निकृष्ट दर्जाची कामे करणे,विना वाहतूक चालान अवैध रेती उचल करणे,ई-टेंडर न करताच साहित्याची खरेदी करणे,अंदाज पत्रकाशिवाय कामे करणे, ऑनलाइन आराखड्यात मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे,कोटेशन ग्रामपंचायतच्या सभेत मंजूर न करणे, बांधकामासाठी मंजुरी न घेणे,घरटॅक्स वसुली केलेली रक्कम बँकेत जमा न करता अफरातफर करणे,खरेदी रकमेच्या बिलातून दोन टक्के जीएसटी न भरणे व स्वतःच्या मुलाच्या नावाने ई-टेंडर भरणे इत्यादी कामे नियमांना डावलून केल्याने,याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी बीडीओकडे(गट विकास अधिकारी)यांच्याकडे तक्रार केली.बीडीओंनी प्रकरण गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे सादर केले.त्यानुसार चौकशी करण्यात आली.चौकशीअंती भ्रष्टाचार व गैरव्यवहार उघडकीस आल्याने अडपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना निलंबित करण्यात आले आहे.मेश्राम यांनी गेल्या चार वर्षात म्हणजेच २०२१ पासून ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार चालवला होता.त्यातच गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार २०२१ मध्येच करण्यात आली होती.परंतु मेश्राम ग्रामसेवक हे ग्रामपंचायत सोडून दररोज बीडीओंकडे चकरा मारत होते.अधिकाऱ्यांसोबत गोड बोलून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत होते.शेवटी गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे तक्रार जाताच भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दिलीप मेश्राम यांना निलंबित व्हावे लागले.मेश्राम यांची चौकशी करण्यासाठी बीडीओंनी तब्बल तीन वर्षे लावल्याने नवलाचीच बाब म्हणावी लागेल.
- Advertisement -

