Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिद्रावस्थेत गेलेल्यांनो लवकर उठा..! आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच..

निद्रावस्थेत गेलेल्यांनो लवकर उठा..! आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उष्ण वातावरणात बदल होताच
सरपटणारे प्राणी जसे बिळातून बाहेर निघतात,तश्याच प्रकारे निवडणुका तोंडावर आल्या की,काही राजकारणी लोकं निद्रावस्थेतून उठून ब्रश करायला लागतात.त्यामुळे अशांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग व सरकारला राज्यातील रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.माहितीनुसार,आयोगाच्या सूचनेनुसार सरकार चालू किंवा पुढील आठवड्यात यासंबंधीची माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेची माहिती मिळाल्यानंतर आयोग आरक्षण व मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समित्या व नगरपंचायतीच्या निवडणुका गत अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत.सुप्रीम कोर्टाने या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने पुढील पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन सरकारने प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले होते.त्यानुसार,आयोगाने सरकारला प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश दिलेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेणे हा लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान असल्याचे  सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही.वेळेवर निवडणुका घेणे हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे.त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किंवा प्रशासक राज आहे,अशा सर्वच महापालिका,नगर परिषदा,नगर पंचायती व जिल्हा परिषदांची लवकर निवडणुका घेण्यात याव्यात.या निवडणुका वेळेवर न घेणे हा लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान आहे.असेही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!