Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीअखिल भारतीय रणरागिणी साहित्यकुंजच्या वतीने एकदिवसीय पुरस्कार सोहळा व महाकवी संमेलन संपन्न…….

अखिल भारतीय रणरागिणी साहित्यकुंजच्या वतीने एकदिवसीय पुरस्कार सोहळा व महाकवी संमेलन संपन्न…….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- अखिल भारतीय रणरागिणी साहित्यकुंजच्या वतीने एकदिवसीय पुरस्कार सोहळा व महाकवी संमेलन नुकतेच वर्धा येथे पार पडले. मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेच्या पार्शवभूमीवर रणरागिणी मंचाने ऑनलाईन काव्यस्पर्धा आयोजीत केली होती.सदर स्पर्धेत अमेरिका,आफ्रिका,इंग्लंड देशासह कर्नाटक,मध्यप्रदेश,गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिकांना भाग घेतला.मंचाच्या अध्यक्षा संगीता बढे,वर्धा,संयोजिका किरण चौधरी गडचिरोली ह्यांनी आयोजन केले होते.स्पर्धेत देसाईगंज वडसाचे सध्या गडचिरोलीत वास्तव्यास असणारे मिलिंद बी.खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला यांना वर्धेत नुकतेच पार पडलेल्या साहित्य संमेलनात पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले मिलिंद बी.खोब्रागडे हे सामाजिक जाणिवेचे कवी,लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे.कविता,लेख,कथा तसेच “माझी लेखणी” हा त्यांचा सुविचार प्रसिद्ध आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय,तृतीय उत्तेजनार्थ,भावस्पर्शी क्रमांकाने गौरविण्यात आलेले आहे.दिनांक- १ ऑक्टोंबर२०२३ ला वर्धेत जागतिक स्तरावर पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे उद्घाटक म्हणून तर उद्योजिका अर्चना इंगोले संमेलनाध्यक्ष म्हणून तर फिल्म प्रोड्युसर गोपीचंद मते,चंद्रपूरचे गझलकार सुनील बावणे तसेच अनेक राज्यभरातून आलेले ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वांनी मिलिंद बी.खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!