Tuesday, July 7, 2026
Homeनागपूर२४ वर्षीय तरुण आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या तयारीत असतांनाच...

२४ वर्षीय तरुण आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या तयारीत असतांनाच धडकले पथक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार अल्पवयीन विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे.त्याचे गंभीर परिणाम होत असतांनाही बालविवाहाच्या तयारीत असलेल्या मंडपात चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून जिल्हा बाल संरक्षण पथकाने एंट्री करून बालविवाह रोखल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वडधामना गावात उघडकीस आली.विशेष म्हणजे,१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील २४ वर्षीय युवकासोबत लावण्याची तयारी सुरू होती.सदरची माहिती मिळताच नागपूर जिल्हा बाल संरक्षण पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली. त्यानंतर,पथकाने कुटुंबीयांशी संवाद साधून समुपदेशन केले. समुपदेशनानंतर कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शवली.सदरची कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण,चाईल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!