Monday, August 24, 2026
Homeचामोर्शी२ फेब्रुवारी पासून नळाला पाणीच नाही...- महावितरण नागरिकांच्या जीवावर उठले की काय?-...

२ फेब्रुवारी पासून नळाला पाणीच नाही…- महावितरण नागरिकांच्या जीवावर उठले की काय?- चामोर्शी तालुक्यातील घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चामोर्शी :- तालुक्यातील कुनघाडा रै,तळोधी,मोकासा व नवेगाव रै येथील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने खंडित केल्यामुळे २ फेब्रुवारी पासून तर आजतागायत पाणीपुरवठा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जातो आहे.

गावातील बंद पाणी पुरवठ्यअभावी नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूरवर पायपीट करावी लागत आहे. बंद पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी कुनघाडा रै येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असूनही अजूनपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही; याचे नवल वाटत आहे.

पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची २ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन नळ योजना सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती.तसेच ८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी संजय मीणा व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अजून किती दिवस नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे; याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!