Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१० हजाराची होळ; पाणी न टाकताच घटाघटा पिला दारू.. - २१ वर्षीय...

१० हजाराची होळ; पाणी न टाकताच घटाघटा पिला दारू.. – २१ वर्षीय तरुणाचा ५ बॉटल दारूत खेल खतम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण बऱ्याचदा आपले मित्र वा मैत्रिणींसोबत होळ म्हणजेच पैज लावीत असतात. कुणाला प्रपोज करणे,कुणाचा मोबाईल नंबर घेणे, एखाद्याला हसवणे वा इतर नाना तऱ्हेची होळ अनेकजण लावतांना आढळून येतात.मात्र,१० हजाराची होळ एका २१ वर्षीय तरुणास जीवघेणी ठरल्याची घटना कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात उघडकीस आली आहे.२१ वर्षीय तरुण व त्याचे काही मित्र यांनी ‘जो कोणी ५ बॉटल दारू पाणी न टाकता पिणार,त्याला १० हजार रुपये दिले जाणार’ अशी पैज लावली.यात कार्तिक नावाच्या २१ वर्षीय तरुणाने होकार देत पुढाकार घेतला.त्यावर कार्तिकचा मित्र असलेल्या व्यंकट रेड्डीने त्याला आव्हान दिले.५ बॉटल दारु पाणी न मिसळता पिऊन दाखव.तुला १० हजार रुपये देतो,अशी पैज रेड्डीने लावली.यानंतर १० हजार रुपये जिंकण्यासाठी कार्तिक पाणी न मिसळता ५ लीटर दारु प्यायला.त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर झाली.त्याला तातडीने कोलारच्या मुलबागलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.कार्तिकचा विवाह वर्षभरापूर्वीच झाला होता.आठ दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.पैज जिंकण्याच्या नादात कार्तिकचा जीव गेला.कार्तिकच्या मृत्यूनंतर व्यंकट रेड्डी आणि सुब्रमणी याच्यासह ६ जणांविरोधात नांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.तर अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!