Friday, May 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसाध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. - तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण कायदा २००३ मधील कलम ५५ व कलम ४७(५)नुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचा अधिकार आहे.त्यामुळे,वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज मिटर बदलताच येत नाही. पण,आता वीज वितरण कंपनी वेगवेगळी कारणे सांगून ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव टाकत आहे. अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसतांना कमी किंवा जास्त बिल येत असल्याचा आरोप करत मीटरच्या तपासणीसाठी पथके पाठवली जात आहेत.ही पथके घरी आल्यानंतर संबंधितांना ॲक्यू चेक यंत्राद्वारे तपासणी करून मीटर ‘स्लो’ किंवा ‘नादुरुस्त’ असल्याचे सांगितले जाते.त्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त आकारणी करून मीटर बदलण्यात येते,असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. त्यातच,ग्रामीण भागात नवीन स्मार्ट मिटर लावण्याची मोहीम सुरू आहे; स्मार्ट मिटर न लावल्यास तुम्हाला दोन ते तीन हजाराचे नवीन डिमांड भरून मिटर घ्यावा लागेल, अशी बतावणी करून स्मार्ट मिटर लावण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांना माहिती नसल्याने वितरण कंपनी जे सांगेल त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय ग्राहकांकडे कोणताही पर्याय नाही.पण,स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऐच्छिक आहे.म्हणजेच एखाद्या ग्राहकाने स्मार्ट मिटर लावायचा नाही,म्हटले तर या प्रकरणी कुणावरही जोर जबरदस्ती केली जात नाही.स्मार्ट मीटर विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत.अश्यातच स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.वाढीव वीज वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार,नवीन स्मार्ट  मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये अचानक तीन ते चारपट वाढ झाली आहे.विशेष म्हणजे,घरातील वीज वापर तेवढाच आहे; पण स्मार्ट मिटर लावताच मोठ्या प्रमाणात बिल वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.हा एकप्रकारे लुटीचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे.म्हणजेच “या हाताने द्या अन् त्या हाताने खवाटून न्या” आणि तेही सर्वसामान्य नागरिकांनाच चुना लगावून.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

गडचिरोलीतील १२० विद्यार्थी दिल्लीकडे रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि राष्ट्रीय स्तरावरील...

जनता महागाई,बेरोजगारी आणि इंधन दरवाढीने त्रस्त असतांना सरकारची नुसती इव्हेंटबाजी- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-देशातील जनता महागाई,बेरोजगारी,इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असतांना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!