Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसाध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. - तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण कायदा २००३ मधील कलम ५५ व कलम ४७(५)नुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचा अधिकार आहे.त्यामुळे,वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज मिटर बदलताच येत नाही. पण,आता वीज वितरण कंपनी वेगवेगळी कारणे सांगून ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव टाकत आहे. अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसतांना कमी किंवा जास्त बिल येत असल्याचा आरोप करत मीटरच्या तपासणीसाठी पथके पाठवली जात आहेत.ही पथके घरी आल्यानंतर संबंधितांना ॲक्यू चेक यंत्राद्वारे तपासणी करून मीटर ‘स्लो’ किंवा ‘नादुरुस्त’ असल्याचे सांगितले जाते.त्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त आकारणी करून मीटर बदलण्यात येते,असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. त्यातच,ग्रामीण भागात नवीन स्मार्ट मिटर लावण्याची मोहीम सुरू आहे; स्मार्ट मिटर न लावल्यास तुम्हाला दोन ते तीन हजाराचे नवीन डिमांड भरून मिटर घ्यावा लागेल, अशी बतावणी करून स्मार्ट मिटर लावण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांना माहिती नसल्याने वितरण कंपनी जे सांगेल त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय ग्राहकांकडे कोणताही पर्याय नाही.पण,स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऐच्छिक आहे.म्हणजेच एखाद्या ग्राहकाने स्मार्ट मिटर लावायचा नाही,म्हटले तर या प्रकरणी कुणावरही जोर जबरदस्ती केली जात नाही.स्मार्ट मीटर विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत.अश्यातच स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.वाढीव वीज वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार,नवीन स्मार्ट  मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये अचानक तीन ते चारपट वाढ झाली आहे.विशेष म्हणजे,घरातील वीज वापर तेवढाच आहे; पण स्मार्ट मिटर लावताच मोठ्या प्रमाणात बिल वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.हा एकप्रकारे लुटीचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे.म्हणजेच “या हाताने द्या अन् त्या हाताने खवाटून न्या” आणि तेही सर्वसामान्य नागरिकांनाच चुना लगावून.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!