- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे.पैश्याची जुळवाजुळव कशी करावी,याकडे सरकारचे लक्ष लागले आहे.अशातच सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही.त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल,असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गुरुवारी विधानसभेत केले.या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढावे यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नेमण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील वित्त,नियोजन,अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या.तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देतांना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत.त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ,असे त्यांनी सांगितले.
- Advertisement -

