Friday, August 14, 2026
Homeगडचिरोलीविविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. - ५ लाखांपासून ते ५०...

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि उद्योजकतेला चालना मिळावी,या उद्देशाने विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.),गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या मुख्य कंपनीसह वडार समाजासाठी पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ,रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,लोहार समाजासाठी ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ,गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि नाथपंथी समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा उपकंपन्यांमार्फत विविध स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांअंतर्गत कृषी संलग्न व्यवसाय,लघुउद्योग, वाहतूक व्यवसाय,तांत्रिक व्यवसाय,पारंपरिक व्यवसाय तसेच विविध सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका आणि महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना उपलब्ध आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत,तर गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.या योजनांमध्ये लाभार्थ्याने बँकेकडे मुद्दल व व्याजाची नियमित परतफेड केल्यानंतर महामंडळाकडून १२ टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात परत जमा केली जाते.
याशिवाय बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असून त्यामध्ये ७५ टक्के बँकेचा आणि २५ टक्के महामंडळाचा सहभाग राहतो. महामंडळाच्या सहभागाच्या रकमेवर केवळ ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.तसेच,थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे.या योजनेमुळे अल्पभांडवल असलेल्या तरुणांना व उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.
या सर्व योजनांच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील पात्र नागरिक,युवक,महिला,स्वयंरोजगार करू इच्छिणारे उद्योजक तसेच संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.),गडचिरोली यांनी केले आहे.
संपर्कासाठी👇
जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
आयटीआयच्या मागे,कॉम्प्लेक्स,गडचिरोली– ४४२६०५.
दूरध्वनी : ०७१३२-२२३०२६
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत उभारणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – झाडीबोली संमेलनासाठी दरवर्षी २५ लाखांचा निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मराठी भाषेचे संवर्धन,स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन,संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन...

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!