Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीयेत्या बुधवारी "बच्चू कडू" आरमोरी शहर व देसाईगंजच्या कुरुड गावात.. -शेतकरी,दिव्यांग बांधव...

येत्या बुधवारी “बच्चू कडू” आरमोरी शहर व देसाईगंजच्या कुरुड गावात.. -शेतकरी,दिव्यांग बांधव तथा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग बांधव,निराधार व गोर गरिबांच्या हक्कासाठी शासनाला धारेवर धरणारे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री “बच्चू कडू” हे येत्या,बुधवार २४ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते त्याच दिवशी आरमोरी शहर व देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावात राज्यव्यापी हक्क यात्रेच्या निमित्ताने सभा घेणार आहेत.सभेत शेतकरी, निराधार,दिव्यांग,विधवा,शेतमजूर यांना मार्गदर्शन व दिव्यांग बांधवांचे हक्क आणि त्यांचे अधिकार यावर मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत.
सध्याच्या घडीला बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी हक्क यात्रा सुरू आहे.या अनुषंगाने येत्या बुधवारी दुपारी २ वाजता आरमोरी शहराच्या बर्डी टी पाईन्ट जवळील साई दामोदर मंगल कार्यालयात जाहीर हक्क सभा आयोजित करण्यात आली आहे.तर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजे देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावातील झुरे मोहल्ल्याच्या मारोती मंदिर देवस्थान या ठिकाणी हक्क सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव,शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावा,शेतकऱ्यांची सुपीक जमीन मोठ्या उद्योगांना देण्यात देवू नये, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पुरवठा करण्यात यावा व इतर हक्क संदर्भात सभा होणार असल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग बांधव,निराधार, मेंढपाळ,मच्छिमार व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!