Tuesday, July 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने जनसुरक्षा विधेयक सभागृहात आणले- विजय वडेट्टीवार

मी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने जनसुरक्षा विधेयक सभागृहात आणले- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-जनसुरक्षा विधेयकावर १२ हजार आक्षेप आले होते.या संदर्भात विरोधकांनी लेखी स्वरुपात त्यांचे मत मांडले होते.पण,सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबून टाकला.मी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने जनसुरक्षा विधेयक सभागृहात आणले आणि मंजूर करुन घेतल्याचे विजय वडेट्टीवारांनी आज, गुरुवार १७ जुलै रोजी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींश बोलतांना सांगितले. विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर झाले त्यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार सभागृहात नव्हते.या गैरहजेरीप्रकरणी वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.त्यामुळे प्रसारमाध्यमांनी याबाबत वडेट्टीवारांना विचारले असता,मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले.सभागृहात असतो तर विधेयकाचे कागद तिथेच फाडून टाकले असते असे विजय वडेट्टीवार म्हणाले.शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.उद्योगपतींविरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत.ही आंदोलने दडपण्यासाठीच सरकारने जनसुरक्षा विधेयक सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!