Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहिला विश्वचषक विजेत्या संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर..!

महिला विश्वचषक विजेत्या संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या काल रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने ७ विकेट गमावल्यानंतर २९८ धावा करून दक्षिण आफ्रिकेला २९९ धावांचे लक्ष्य दिले होते.मात्र,भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजून भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता बनला.विजयाने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले आणि रात्रीच्या सुमारासच सर्वत्र जल्लोष साजरा करून मोठा उत्सव साजरा करण्यात आला.दुसरीकडे,विजयानंतर क्रिकेट बोर्डाकडून संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते माजी खेळाडूंपर्यंत सर्वांनी संघाचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय.अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी अविश्वसनीय कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती.संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवली. खेळाडूंचे अभिनंदन.हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरणा देईल.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!