Friday, July 10, 2026
Homeनागपूरभोंदू बाबा प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भोंदू बाबा प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस येताच राज्यात एकच खळबळ उडाली आहे.अश्यातच विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की,या प्रकरणाला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरातला भेटायला विरोधी पक्षाचे कोण-कोण गेले,याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत.मात्र,ते पोलिसांचे काम आहे.माझे नाही.केवळ कोणासोबत फोटो आहेत म्हणून कारवाई करणे चुकीचे आहे.पण,जर कोणाचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग आढळला,तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा नक्कीच उगारला जाईल.प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, ‘इंटेलिजन्स’च्या आधारे आम्हीच या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे.पीडित महिलांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे काम सुरू आहे.या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ स्तरावर देखरेख सुरू आहे.राज्याच्या पोलिस महासंचालकांना स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी)स्थापना केली आहे. नाशिक पोलिस आयुक्त आणि ‘एसआयटी’ मिळून वेगाने तपास करत आहेत. आपल्या ‘तथाकथित शक्ती’ चा वापर करून महिलांना जाळ्यात ओढणे,यापेक्षा दुसरा मोठा गुन्हा असू शकत नाही.ही महिलांच्या सन्मानाची आणि अस्मितेची लढाई आहे.ज्या-ज्या महिलांसोबत गैरप्रकार झाला आहे,त्या प्रत्येकीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणाकडेही या संदर्भात पुरावे असल्यास त्यांनी ते समोर आणावेत,दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत.. – शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतमालाचे मूल्यवर्धन,सुरक्षित साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'कृषी पायाभूत सुविधा निधी' योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य...

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!