Sunday, June 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबस आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जखमी तर ४ प्रवाशांचा मृत्यू…..

बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जखमी तर ४ प्रवाशांचा मृत्यू…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- मुंबई-आग्रा महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.या मार्गावरील चांदवडमधील राहुड घाटामध्ये एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला असून या अपघातात 4 प्रवासी दगावल्याची प्राथमिक माहिती समोर पाआली आहे.सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावहून ते वसईला जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. या अपघातामध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा मार्गावर हा अपघात घडला.भरधाव वेगात असलेल्या एसटीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली.राहुड घाट परिसरामध्ये हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते.बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. सारे काही इतक्या वेगाने घडले की प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही.बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बाहेर फेकले गेले किंवा बसच्या खिडक्यांवर आदळले.प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ४ प्रवासी दगावले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.अनेक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे धक्कादायक चित्र या अपघातानंतर रस्त्यावर दिसत होते.या मार्गावरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांपैकी काहींनी पुढाकार घेऊन अपघातग्रस्त बसच्या सांगाड्यावर चढून अडकलेल्या प्रवाशांना एक-एक करुन बाहेर काढले.मतदकार्य पोहचण्याआधीच या प्रवाशांनी केलेल्या मदतीमुळे बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढता आले. अपघातानंतर बस डिव्हाडरला आदळून थांबल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरुन स्पष्ट होत आहे.या अपघातात जखमी झालेल्या १७ प्रवाशांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!