Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपुढील दोन दिवसात धो-धो बरसणार पाऊस..

पुढील दोन दिवसात धो-धो बरसणार पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस येत्या दोन दिवसांत राज्यात धो-धो बरसणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.आज,गुरुवार १२ जून रोजी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे अलर्ट हवामान विभागाने जारी केले आहे. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यास आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यातच कोल्हापूर, सांगली,रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच विदर्भातील वाशिम, अकोला,अमरावती,यवतमाळ,वर्धा,नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान केंद्रानुसार,नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा गाठला आहे.आता मान्सून पूर्वेकडील भागात सरकत आहे.पुढील ४८ तासांत विदर्भ,छत्तीसगड,ओडिसा या भागात मान्सून व्यापला जाणार आहे.बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटक,छत्तीसगड,महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!