- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशातील संपूर्ण नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणू,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते.त्यानुसार पावले उचलण्यात आली.जे जंगल सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ इच्छितात,त्यांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल,असेही स्पष्ट केले होते.अश्यातच केंद्राने निश्चित केलेली मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवार २५ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांनी ३२ शस्त्रे आणि ५१५ काडतुसेसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.विशेष म्हणजे,आत्मसमर्पण करणारे सर्वजण छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर विभागातील असून, त्यांच्यामध्ये तेलंगणातील एकही व्यक्ती नाही. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये वरिष्ठ नेते,हेमला ऐतू ऊर्फ विज्ञा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्या आणि दक्षिण बस्तर डिव्हिजनल कमिटीचे प्रभारी पोडियम लाचू उर्फ मनोज,डिव्हिजनल कमिटी सदस्य आणि(गुरुला आर्मी पीएलजीए)मधील प्लाटून कमांडर या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.या सर्व नक्षलवाद्यांनी तेलंगणाचे पोलीस महासंचालक(डीजीपी)बी.शिवधर रेड्डी यांच्यासमोर हैदराबाद येथे आत्मसमर्पण केले. तेलंगणा सरकारच्या पुनर्वसन धोरणाने प्रभावित होऊन आणि पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण करणाऱ्यांना १.२० कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज,केंद्र सरकारचे प्रोत्साहन आणि मोफत आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.
- Advertisement -

