- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.बारावीत महाराष्ट्र राज्याचा ८९.७९ टक्के एकूण निकाल लागला होता.यात मुलींनीच बाजी मारून ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत बारावीच्या निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली. अश्यातच आज,शुक्रवार ८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात दहावीचा राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.९६ टक्के आहे,तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.५६ टक्के आहे.राज्यात १४ लाख २० हजार ४८६ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय निकालात कोकण विभाग प्रथम,तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
निकालात घसरण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे,पूर्वी कॉपी करण्याचे प्रमाण वाढलेले होते.त्यामुळे,रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्यांना कमी टक्केवारी,तर कॉपी करणारे वरचढ ठरायचे.मात्र,गेल्या दोन वर्षांपासून शासनाने कॉपीमुक्त अभियान सुरू केल्याने अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस घाम फुटू लागला आहे.हे विशेष.
- विभागनिहाय निकाल👇
१.नागपूर- ८९.०७ टक्के
२.पुणे- ९४.२४ टक्के
३.कोकण- ९७.६२ टक्के
४.मुंबई- ९४.९७ टक्के
५.कोल्हापूर- ९५.४७ टक्के
६.अमरावती- ९०.५० टक्के
७.छत्रपती संभाजीनगर- ८८.४१ टक्के
८.नाशिक- ९०.५३ टक्के
९.लातूर- ८८.४२ टक्के
- Advertisement -

