- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- रोजगाराची हमी असलेल्या योजनेत ग्रामरोजगार सेवकांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.रोजगार हमी योजनेची रोजगारसेवक मागील १७ वर्षाहून अधिक कालावधीपासून अंमलबजावणी करीत आहेत.परंतु मागील १७ वर्षाहून अधिक कालावधीपासून योजनेंतर्गत कार्यरत असतानादेखील रोजगाराची हमी असलेल्या योजनेत ग्रामरोजगारसेवकांना शाश्वत नोकरीची हमी नाही.ही अत्यंत खेदजनक बाब आहे.वाढत्या महागाईच्या काळात कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे,मुलांचे शिक्षण,वयोवृद्ध आई-वडिलांचे आजारपणात औषधोपचार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे इतर राज्याप्रमाणे रोजगारसेवकांना शासकीय सेवेत कायम करावे; अशी त्यांची मागणी आहे.
ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेचे ग्रामपातळीवरील कामकाज सांभाळणे, मजुरांवर देखरेख,अहवाल देणे,दस्तावेज अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ग्रामरोजगारसेवकावर असते. मात्र,शासकीय पातळीवर त्यांची उपेक्षा केली जात आहे.कामासाठी देण्यात येणारे मानधनसुद्धा नियमित दिले जात नाही.दीर्घकाळापासून अत्यल्प व तुटपुंज्या मानधनात ग्रामरोजगारसेवक सेवा देत आहेत.
रोहयोंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरील मग्रारोहयोच्या अंमलबजावणीतील ग्रामरोजगरसेवक हा महत्त्वपूर्ण घटक आहे.नमुने जतन करणे,नोंदणीकृत मजुरांना अकुशल कामे उपलब्ध करून देणे व त्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर स्थावर मालमत्ता निर्मिती करण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांवर आहे. सोपविण्यात आलेली जबाबदारी व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून ते कर्तव्य पार पाडत आहेत. तरीही रोजगार सेवकांची दखल शासन दरबारी घेतली जात नसल्याने शासणाप्रती ग्राम रोजगार सेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

