Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था “ना घर के ना घाट के” अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक असायचे. पण,आता वर्गात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बीएलओची मतदारयादी, एसआयआर,यू-डाएस प्लस,जनगणना,विविध सर्वेक्षण, शिष्यवृत्ती,पोषण आहाराचा हिशोब व इतर विविध जबाबदारीचे ओझे लादण्यात आल्याने शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते.तेही मनुष्य प्राणीच आहेत.डोक्याच्यावर पाणी गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार.एकीकडे मोठा गाजावाजा करून शाळा प्रवेशोत्सव करायचा आणि विद्यार्थी गुणवत्तेची बोंबाबोंब करून शिक्षणाचे ढोल पिटायचे.गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकाला वर्गात शिकवू तर द्या नं..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सध्या स्थितीत शिक्षक एकंदरीत शिकविण्यापेक्षा इतर कारकुनी कामात अडकले आहेत. अश्यातच सतत मोबाइलवर तात्काळ माहिती देण्याचा संदेश येतो,अनेकदा सर्व्हर डाऊन असतो,शाळेत नेटवर्क मिळत नाही.डेटा वेळेवर गेला नाही की गुणवत्ता ढासळली म्हणून जाब विचारला जातो.शिक्षकांना एसआयआरचे काम करण्यासाठी आधी सकाळी साडे आठ ते अडीच वाजे शाळांची वेळ करण्यात आली. आता १५ ते २९ जुलैदरम्यान सकाळी साडे सात ते साडे बारा वाजेची वेळ बदलली,मात्र शिक्षकाकडून बीएलओ कामे कमी न करता ‘जैसे थे’ ठेवले आहे.त्यामुळे केवळ शाळांची वेळ बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच,एसीच्या केबिनमध्ये बसून गुणवत्तेचे धोरण ठरवणाऱ्यांना मैदानावरचा शिक्षक किती तारेवरची कसरत करतोय हे दिसणार तरी कधी?असा विचार अनेक शिक्षकांच्या मनात घर करून सोडतो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!