Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीउमेद अभियानातील बचत गट आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर 

उमेद अभियानातील बचत गट आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- उमेद अभियानांतर्गत बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी कर्ज योजना राबविली जाते.सदर अभियनांतर्गत गडचिरोली जिल्यातील अनेक बचत गटांना दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येत आहे.यामुळे जिल्ह्यातील अनेक महिला आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रशासनाच्या वतीने जनजागृती करुन महिला बचत गटांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला जिल्ह्यातील काही महिला बचत गटांनी प्रतिसाद देत अर्ज दाखल केले.दस्ताऐवजाची पडताळणी झाल्यानंतर बँकामार्फत जवळपास १०० कोटींवर कर्जाचे वितरण करण्यात आले होते.यंदाही शासन व प्रशासनाच्या पुढाकाराने उमेद अभियान व बँकांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील बचत गटांना कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.तीन हजारावर बचत गटांची नोंद जिल्ह्यातील महिला बचत

गटाच्या आकडेवारींची माहिती डीआरडीए तसेच उमेद अभियान आणि माविमकडे आहे.ग्रामीण व शहरी भाग मिळून तीन हजारापेक्षा अधिक महिला बचत गट जिल्ह्यात आहेत.या बतच गटांना उमेद अभियानांतर्गत कर्ज वितरण करुन महिलांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

उमेद अभियानांतर्गत बचत गटांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, शिविर आयोजित करुन कर्ज प्रकरणे निकाली काढणे,त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येते.या कर्जाच्या माध्यमातून काही बचत गटांनी छोटे-मोठे उद्योग सुरु केले आहे. या उद्योगाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना रोजगार मिळाला आहे.

ज्या बचत गटांना कर्ज हवे आहे; अशा गटाच्या अध्यक्ष व सचिवांनी उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक, माविम किवा बँकाकडे संपर्क साधावा.मार्गदर्शन मिळाल्यानंतर दस्ताऐवजासह अर्ज करावा लागतो. दस्ताऐवजाची पडताळणी झाल्यानंतर बँकामार्फत कर्ज प्रकरण मंजूर करुन,कर्जाची रक्कम गटाच्या खात्यात जमा केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!