Saturday, June 20, 2026
Homeनागपूरआधी प्रेमविवाह; नंतर चारित्र्यावर संशय अन् शेवटी जन्मठेपेची शिक्षा….

आधी प्रेमविवाह; नंतर चारित्र्यावर संशय अन् शेवटी जन्मठेपेची शिक्षा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयामुळे एक दिवसाच्या बाळाला फरशीवर आपटून त्याची हत्या करणाऱ्या नराधम बापाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.तसेच,दहा हजार रुपये दंड ठोठावला.न्यायाधीश गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला.सदर घटना मेडिकलमध्ये घडली होती.

गिरीश ऊर्फ श्रीकांत गोंडाणे वय ३२ वर्षे,असे आरोपीचे नाव असून तो सावर्डी,नांदगाव पेठ, अमरावती येथील रहिवासी आहे.त्याचा, पत्नी प्रतीक्षासोबत २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. दरम्यान,प्रतीक्षाला गर्भधारणा झाली.बाळंतपणाच्या वेळी तब्येत खालावल्यामुळे तिला नागपुरातील मेडिकलमध्ये हलविण्यात आले.तिने ३१ डिसेंबर २०२२ रोजी मुलाला जन्म दिला.आरोपी त्या दिवशी सायंकाळी ७ च्या सुमारास मेडिकलमध्ये गेला. त्याने प्रतीक्षासोबत भांडण केले व रागाच्या भरात तिच्या कुशीत झोपलेल्या मुलाला उचलून हवेत फिरवले आणि फरशीवर आपटले.त्यामुळे ते मुल जागेवरच मरण पावले.सुरक्षा गार्ड उत्तरा द्विवेदी यांनी इतरांच्या मदतीने आरोपीला पकडून अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.सहायक पोलिस निरीक्षक आनंदकुमार खंडारे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध खटला दाखल केला.न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड.क्रांती शेख (नेवारे) यांनी कामकाज पाहिले.त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!