- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेकदा कॉपी बहाद्दर परीक्षेत
नवनवीन शक्कल लढवून परीक्षा पास होतांना दिसून येतात.राज्याच्या विविध भागात कॉपी बहाद्दर यांच्या समवेत पेपरफुटी व इतर प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.अशातच आता परीक्षेत कॉपी किंवा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.परीक्षांची अखंडता राखण्यासाठी आणि फसवणूक,पेपरफुटी इत्यादी घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.याशिवाय नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये संशोधन आणि विकास कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा काळात किंवा दरम्यान कोणत्याही केंद्रात छोटीशी तक्रार आल्यास संबंधित पथक त्याचे त्वरित ऑडिट करेल.हा सेल देशभरातील केंद्रे,तक्रारी आदींवर लक्ष ठेवणार आहे.अशा केंद्रांवर तात्काळ बंदी घालण्यात येईल.नवीन नियमांनुसार,गैरवर्तन आढळल्यास,थेट भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला जाईल. आतापर्यंत अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून न्यायालय त्यांना ताकीद देऊन सोडत असे, परंतु,२०२५ च्या परीक्षेपासून असे विद्यार्थी पुन्हा कधीही परीक्षेसाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाहीत; असे कडक नियम करण्यात आले आहेत.परीक्षा केंद्राचा प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल.त्याचा रेकॉर्ड एक वर्षापर्यंत राहील.परीक्षेदरम्यान प्रत्येक १५ मिनिटांनी सीसीटीव्ही आणि विद्यार्थ्यांचे फोटो पडताळून पहिले जाईल,असे अनेक नवीन नियम येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहेत.
- Advertisement -

