- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले असतांनाही एखादा आमदार किंवा खासदार म्हणजेच लोकप्रतिनिधी जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांना भेटायला जातात तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने उठून उभे राहत त्यांना अभिवादन करावे असा नोव्हेंबर २०२५ मध्ये जीआर काढण्यात आला.मात्र आता त्यात एक सुधारणा करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,पोलिस,महसूल अधिकारी यांना काही प्रकरणात दंडाधिकारी अर्थात न्यायालयासारखे अधिकार असतात. त्यात या अधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा येते.त्यामुळे आता सरकारने यात थोडी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी कशासाठी कार्यालयात आले आहेत किंवा बोलाविले आहेत,यावर असे अभिवादन करायचे की नाही ते ठरले जाणार आहे. एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी अथवा इतर प्रकरणात दोषी ठरला असल्यास,चौकशी,सुनावणीसाठी अपीलकार,पक्षकार म्हणून बोलाविण्यात आले असल्यास अधिकारी अभिवादन करू शकत नाही.तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना उमेदवारी अर्ज भरणे, छाननी,सुनावणी इत्यादी वेळेस शासकीय कार्यालयात उपस्थित राहिले असल्यास आमदार, खासदार यांना अधिकाऱ्याने अभिवादन करण्याची गरज व शासकीय कार्यालयांत कोणतीही विशेष वागणूक देऊ नये,असे स्पष्ट आदेश काल मंगळवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले.मात्र,इतर आमदार वा खासदार शासकीय कार्यालयात आल्यास आणि कार्यालयातून निघून जातांना,सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवरून उभे राहून स्वागत,अभिवादन करणे अनिवार्य आहे. लोकप्रतिनिधींशी संवाद साधतांना अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण,नम्र आणि आदरयुक्त भाषा वापरणे अपेक्षित आहे.मोबाईल किंवा टेलिफोनवर बोलतांनाही अधिकाऱ्यांनी आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे.लोकप्रतिनिधींच्या तक्रारी काळजीपूर्वक ऐकून घेऊन,नियमांनुसार कामांचा त्वरित आढावा घेणे बंधनकारक आहे.आमदार-खासदारांच्या पत्रांची नोंद ठेवून,त्यांना कमाल दोन महिन्याच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे.
- Advertisement -

