Friday, July 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ठराविक कालावधीशिवाय पुढच्या सिलेंडरची बुकिंगच होणार नाही.. - गॅस घेतेवेळी ओटीपी...

आता ठराविक कालावधीशिवाय पुढच्या सिलेंडरची बुकिंगच होणार नाही.. – गॅस घेतेवेळी ओटीपी सांगणे बंधनकारक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गॅस पुरवठा कंपन्यांनी सिलेंडर गॅस बुकिंगमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आता गॅसधारक ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलेंडरसाठी बुकिंग करता येणार नाही.विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.१४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आले आहे.ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे; त्यांना आता एका सिलेंडरनंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती.गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचबरोबर,गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.सिंगल सिलेंडर कनेक्शन म्हणजेच ज्याच्याकडे एकच गॅस सिलेंडर आहे,ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील.ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी नियम अधिक कडक केले आहेत.त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. ओटीपी (OTP)आणि ई-केवायसी (e-KYC)हे महत्त्वाचे असेल.गॅस घेतेवेळी ओटीपी सांगणे आता बंधनकारक आहे.तसेच,ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही,त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते.शासन एका वर्षात १२ सिलेंडरवर सबसिडी देते.जर एखाद्या ग्राहकाने आपला हा कोटा पूर्ण केला असेल,तर १३ व्या सिलेंडरसाठी त्यांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या,घरी पाहुणे आले आहेत का?किंवा घरात काही कार्य आहे का?अशी माहिती द्यावी लागेल.या माहितीची पडताळणी केल्यानंतरच कंपनी अतिरिक्त गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत.. – शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतमालाचे मूल्यवर्धन,सुरक्षित साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'कृषी पायाभूत सुविधा निधी' योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य...

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!