- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-कृषी विभाग अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया (NMEO-OS)सन २०२५-२६ यां वर्षी जिल्ह्यात नवीन अभियान सुरु होत असून सदर अभियान अंतर्गत रब्बी करडई,तीळ,जवस,मोहरी, भुईमुग इत्यादी तेलबिया पिकांचे महत्व पटवून त्याचे शेतकऱ्यांना व्यापक जनजागृती होईल व पर्यायाने त्याचा लाभ शेतकऱ्यांना व नागरिकांना होईल,तसेच क्षेत्र,उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल,पेरणीपासून ते काढणी पश्यातचे लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या हेतूने आज,मंगळवार १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी सुमानंद सभागृह,आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित असून तेलबिया लागवड व काढणी पश्चात प्रक्रिया करणारे शेतकरी स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.तरी मोठ्या संख्येने महिला शेतकरी व शेतकरी यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रिती हिरळकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
योजनेचे उद्धिष्ट👇
१. गळीतधान्य पिकांखालील सिंचित क्षेत्र,उत्पादन व उत्पादकता यामध्ये वृद्धी करणे.
२.कमी उत्पादकता असणाऱ्या पिकांखालील क्षेत्र गळीतधान्य पिकाखाली आणणे.
३. तृणधान्य/कडधान्य पिकात आंतरपिकाद्वारे गळीतधान्य पिकांखालील क्षेत्रात वाढ करणे.
४. भात पिकाच्या काढणी नंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्रावर गळीतधान्य पिके घेऊन क्षेत्र विस्तार करणे.
- Advertisement -

