Tuesday, July 7, 2026
Homeनागपूरअपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणत उच्च न्यायालयाने सरपंचाची याचिका फेटाळली..

अपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणत उच्च न्यायालयाने सरपंचाची याचिका फेटाळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खंबी(पिंपळगाव)येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचा निरूपा बोरकर यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवत न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबळकर यांच्या खंडपीठाने सरपंचाची याचिका फेटाळून लावली आहे.
३ एप्रिल २०२५ रोजी सुदाम खोटेले आणि तुलाराम खोटेले यांनी सरपंचा निरूपा बोरकर यांच्याविरोधात तक्रार केली होती.सरपंच आणि त्यांच्या पतीने शासकीय जमिनीवर गट क्र.२३१ आणि मालमत्ता क्र. ४४१ यावर अतिक्रमण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.या प्रकरणाची दखल घेत गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मे २०२५ रोजी सरपंचास अपात्र घोषित केले होते.या निर्णयाविरोधात सरपंचाने नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांकडे दाद मागितली,पण तिथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.सरपंचाच्या वतीने अतिक्रमणाचे आरोप खोटे असल्याचे सांगण्यात आले.तसेच दंडाची पावती किंवा तलाठ्यांनी सादर केलेला ‘ग्राम अर्ज ८’ हा अतिक्रमणाचा ठोस पुरावा मानला जाऊ शकत नाही,असा युक्तिवाद करण्यात आला.या नोंदींवर खुद्द तत्कालीन सरपंच आणि सचिवांच्या स्वाक्षऱ्या आहेत,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.सर्व पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मालमता क्रमांक-४४१ वरील अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी सरकारी दस्तऐवज(ग्राम अर्ज ८)पुरेसे आहे.सरकारी कागदपत्रांमधील या नोंदींवर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवर अतिक्रमण ठरल्यामुळे,जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी सरपंचांना अपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे; असे म्हणत न्यायालयाने सरपंचाची याचिका फेटाळून लावली आणि अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!