Sunday, August 30, 2026
Homeनागपूरअपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणत उच्च न्यायालयाने सरपंचाची याचिका फेटाळली..

अपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणत उच्च न्यायालयाने सरपंचाची याचिका फेटाळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खंबी(पिंपळगाव)येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचा निरूपा बोरकर यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवत न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबळकर यांच्या खंडपीठाने सरपंचाची याचिका फेटाळून लावली आहे.
३ एप्रिल २०२५ रोजी सुदाम खोटेले आणि तुलाराम खोटेले यांनी सरपंचा निरूपा बोरकर यांच्याविरोधात तक्रार केली होती.सरपंच आणि त्यांच्या पतीने शासकीय जमिनीवर गट क्र.२३१ आणि मालमत्ता क्र. ४४१ यावर अतिक्रमण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.या प्रकरणाची दखल घेत गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मे २०२५ रोजी सरपंचास अपात्र घोषित केले होते.या निर्णयाविरोधात सरपंचाने नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांकडे दाद मागितली,पण तिथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.सरपंचाच्या वतीने अतिक्रमणाचे आरोप खोटे असल्याचे सांगण्यात आले.तसेच दंडाची पावती किंवा तलाठ्यांनी सादर केलेला ‘ग्राम अर्ज ८’ हा अतिक्रमणाचा ठोस पुरावा मानला जाऊ शकत नाही,असा युक्तिवाद करण्यात आला.या नोंदींवर खुद्द तत्कालीन सरपंच आणि सचिवांच्या स्वाक्षऱ्या आहेत,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.सर्व पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मालमता क्रमांक-४४१ वरील अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी सरकारी दस्तऐवज(ग्राम अर्ज ८)पुरेसे आहे.सरकारी कागदपत्रांमधील या नोंदींवर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवर अतिक्रमण ठरल्यामुळे,जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी सरपंचांना अपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे; असे म्हणत न्यायालयाने सरपंचाची याचिका फेटाळून लावली आणि अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!