Monday, July 13, 2026
Homeगोंदियाअपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. - रेल्वेच्या...

अपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. – रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले असून वन्यजीव प्रेमी तसेच संबंधित विभागाकडून अपघातानंतर उपाययोजना आखण्यासंदर्भात आवाज उठवला जातो.त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो; अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे; नुसत्या एकट्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा विचार केला तर आतापर्यंत गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर तब्बल १२५ वन्यप्राण्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.यात वाघासह इतर प्राण्यांचा सुद्धा समावेश आहे.त्यातच दरवर्षी या मार्गावर वन्यजीवांचा बळी जात असल्याने सदरचा मार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गोंदिया-बल्लारशा हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प या ‘कॉरिडॉर’ लगत जातो. हाच रेल्वे मार्ग पुढे जबलपूर आणि बालाघाटपर्यंत तर चांदाफोर्ट पुढे तेलंगणापर्यंत जातो.त्यामुळे या रेल्वे मार्गावरून बरेचदा वन्यप्राण्यांची वर्दळ असते.त्यामुळेच रेल्वे विभागाने २०१८ मध्ये वन्यप्राण्यांसाठी असुरक्षित रेल्वे मार्गांची यादी जाहीर केली होती व उपाययोजनेबाबतही शिफारसी केल्या होत्या.यात गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा सुद्धा समावेश होता परंतु,अद्यापही उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे.वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण,भुयारी मार्गासह इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!