- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गरीब तसेच गरजूंना धान्य मिळावे; यासाठी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वितरण केले जाते.दरम्यान, पुरवठा विभागाद्वारे रेशन कार्डधारकांच्या कुटुंबातील सर्व लाभार्थीची ई-केवायसी करण्याची सूचना मागील काही महिन्यांपासून दिली आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करणे आवश्यक आहे.असे असले तरी अनेकांनी ई-केवायसी केलीच नाही.त्यामुळे आता जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील ई-केवायसी न केलेल्या कार्डधारकांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे.
रेशन दुकानदारांकडे आधार कार्डचा क्रमांक दिल्यानंतर त्यांच्याजवळील मशीनद्वारे ई-केवायसी करता येते.त्यामुळे ज्या लाभार्थींनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेली नाही; अशांनी रेशन दुकानदारांकडे जाऊन लवकरात-लवकर ई-केवायसी करून घ्यावी.
- Advertisement -

