- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेल्या मिक्सर ट्रकने समोरील कंटेनरला जोरात धडक दिली आणि त्यानंतर विरुद्ध बाजूला असलेल्या कारवर आदळला.या विचित्र अपघातात चालकाचा मृत्यू झाला.ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा महामार्गावरील जामठा टी-पॉइंट येथे काल,रविवारी २९ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
रामलाल गोपीलाल चव्हाण वय ५७ वर्षे,रा.गुढा, भिलवाडा,राजस्थान असे मृताचे नाव असून,तो या दोन ट्रकपैकी एकाचा चालक असावा,अशी माहिती पोलिसांनी दिली.तो नेमके कोणते वाहन चालवीत होता,याचा तपास हिंगणा पोलिस करीत आहेत.
या घटनेतील फिर्यादी कारचालक स्वप्निल हुलके,रा. मानेवाडा,नागपूर हे आपल्या कारने कार क्रमांक- एमएच-४९/सीडी ९४१२ जामठा चौकात आले व त्यांना वर्धा लेनवरून नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर जाण्यासाठी यूटर्न घेण्यासाठी थांबले होते.त्याच वेळी केए-४१/डी-४४१५ क्रमांकाचा कंटेनरसुद्धा नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर चौकात आला व त्यालाही चौकातून यूटर्न घेऊल वर्ध्याकडे जाणाऱ्या लेनवर जायचे असल्याने कंटेनरही चौकात आला होता.
दरम्यान,नागपूरकडे जाणाऱ्या लेनवरून सुसाट वेगाने येणाऱ्या टीएस-२२/टी-९४२३ क्रमांकाच्या मिक्सर ट्रकने कंटेनरच्या केबिनकडील भागात जोरात धडक दिली आणि दुसऱ्या लेनवर उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळला.यात कंटेनर चालक व आणखी एक चालक जखमी झाले.पहाटेच्या सुमारास मार्गाने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली व जखमी दोघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत ठवरे,पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघ हे पोलिस कर्मचाऱ्यांसह पोहोचले.घटनास्थळी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी मिक्सर ट्रकच्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (अ),३२४ (५),सहकलम १८४,१७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास हिंगणा पोलिस करीत आहेत.
- Advertisement -

