Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीभामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांना ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे...

भामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांना ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-   ग्रामसभा बरखास्त करण्याच्या प्रकरणावर वारंवार नोटीस बजावून देखील अनुपस्थित राहिल्याबद्दल भामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात ५० हजारांचे जामीनपात्र वारंट काढून दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भामरागड नगरपंचायत क्षेत्रातील वनहक्क समिती व ग्रामसभा मुख्याधिकाऱ्यांनी ठराव ऑक्टोबर 2021 रोजी अवैध घोषित करून बरखास्त केली.याविरोधात

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकाकर्त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनयमच्या तरतुदीचे उल्लंघन करीत ग्रामसभा यांचेविरोधात बरखास्त केली आहे.यासंदर्भातील ठरावदेखील परस्पर घेतला गेला.त्यामुळे ग्रामसभा बरखास्त करण्याचा निर्णय रद्द करावा,अशी मागणी याचिकेत केली आहे.यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे वांवार नोटीस बजावूनही मुख्याधिकारी गैरहजर राहिल्याने ते उत्तर दाखल करण्यास असमर्थ ठरले. यावरुन उच्च न्यायालयाने मुख्याधिकारी यांना ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट बजावून दोन आठवड्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. श्रावण ताराम यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाचे या आदेशाने भामरागड नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारीविरोधात नोटीसाने खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!