Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअल्पवयीन मुले-मुलींनो सावधान..! अन्यथा २५ वर्षे  होईपर्यंत मिळणार नाही 'लायसन्स'..

अल्पवयीन मुले-मुलींनो सावधान..! अन्यथा २५ वर्षे  होईपर्यंत मिळणार नाही ‘लायसन्स’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- अठरा वर्षे वयोगटाखालील मुले-मुली दुचाकी चालविताना आढळल्यास २५ हजार रुपये दंडासह २५ वर्षे वय होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये; असे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी काढले.त्यासंबंधित त्यांनी सर्व उप प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.त्यामुळे आता सुसाट तरुण आणि तरुणींनी वेळीच सुधारण्याची गरज आहे.

मोटर वाहन कायद्यातील (२०१९) तरतुदींनुसार राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आदेश काढले आहे.त्यात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळल्यास त्या मुलाचे पालक किंवा गाडी मालकास तीन वर्षे कैद २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे.अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी दुचाकी चालवित असल्याचे निदर्शनास आले तर वयाची २५ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्यांना वाहन परवाना देऊ नये; असेही आदेशात बजावले आहे.या तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.

दुचाकी चालविण्याचा परवाना वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतरच दिला जातो.परंतु अल्पवयीन असताना ५० सीसीपेक्षा जास्त सीसीचे वाहन चालविताना आढळल्यास वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालकाचा परवाना देण्यात येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!