Tuesday, June 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुजल्यावर कळतंय; शरद पवारांनी मारलंय कुठं..!-बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा..

सुजल्यावर कळतंय; शरद पवारांनी मारलंय कुठं..!-बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात एक बॅनर लावून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा चिमटा काढला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दाभोळकर चौकात एक बॅनर लावले आहे.या बॅनरवर त्यांनी सुजल्यावर कळतंय; शरद पवारांनी मारलंय कुठं..! असा एका ओळीचा मजकूर लिहिला आहे.या बॅनरवर शरद पवारांचा फोटो व तुतारी वाजवणारा माणूस या त्यांच्या पक्षचिन्हही आहे.शुक्रवारी रात्री हे बॅनर लागल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.या बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात हे बॅनर लावले आहे.या बॅनरवरील एका ओळीतून शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दाखवलेल्या अस्मानाची प्रचिती येत असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये केला जात आहे.

महाराष्ट्राच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हटले जाते.विपरित परिस्थितीतही ते आपल्या राजकीय विरोधकांना अस्मान दाखवून ते आपल्या राजकीय चाणाक्षतेची चुणूक दाखवतात.त्यांच्या राजकीय चातुर्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा यशस्वी प्रयोग राबवून दाखवला.पण शिवसेनेतील फुटीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार पडले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!