Monday, July 13, 2026
Homeनागपूरबुद्धपौर्णिमेच्या दिवशीच कां केली जाते प्राणीगणना?

बुद्धपौर्णिमेच्या दिवशीच कां केली जाते प्राणीगणना?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम हे एक वेगळे समीकरण झाले आहे. बुद्धपौर्णिमेची रात्र वर्षातील सर्वाधिक लख्ख प्रकाशाची रात्र समजल्या जाते.त्यामुळे यादिवशी महाराष्ट्र वन विभागाकडून वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.या उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी, २२ मे रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले.पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३७, उमरेड करांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३४ आणि बोर (वर्धा) व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३५ मचाणांची व्यवस्था या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

वन्यजीव प्रेमींसाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय उत्सुकतेचा असल्याने हे क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज वन विभागाला प्राप्त होतात.त्याची छाननी करून त्यानंतर काही अर्जावर शिक्कामोर्तब करण्यात येते.त्यानंतर एका मचाणावर एक निसर्गप्रेमी आणि वन्य रक्षकाची नेमणूक होते.विशेष म्हणजे पेंचसह उमरेड करांडला, पवनी आणि बोरच्या सर्वच वनपरिक्षेत्रात जय्यत तयारी करण्यात येत आहे.खास मचाणांची व्यवस्था करण्यात येते.पाणवठ्याजवळ उभारण्यात आलेल्या मचाणावरून रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यास येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.

प्राणिगणना उन्हाळ्यातच करण्याचे मुख्य कारण म्हणजे,या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा भासतो.अशावेळी जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात.त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणांवर मुक्काम करतात.रात्री पाण्यासाठी पाणवठ्यावर प्राणी आले की त्यांच्या नोंदी घेतल्या जातात.

नासाची मिल्कमूनची व्याख्या अशी आहे👇

बौद्धपौर्णिमेचा चंद सर्वात प्रकाशमय चंद्र म्हणून ओळखण्यात येतो.अंतराळ संस्था नासाने यादिवशीच्या चंद्राची व्याख्या कॉर्नमून किंवा मिल्कमून म्हणूनही केली आहे.यंदाचा चंद्र सुमारे तीस टक्के अधिक चमकणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.अशा बौद्धपौर्णिमेच्या रात्री वन विभागाने निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!