Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील दहाव्या सत्रात मिलिंद खोब्रागडे व संतोष कपाले विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील दहाव्या सत्रात मिलिंद खोब्रागडे व संतोष कपाले विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.या उपक्रमाचे दहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३० कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे दहावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गडचिरोली येथील नवोदित कवी  मिलिंद खोब्रागडे व रायगाव (जि. बुलढाणा ) येथील शेतकरी कवी संतोष कपाले या  दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनु. “बाईपण लय भारी” व “आनंदात जगू या ” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

मिलिंद खोब्रागडे हे गडचिरोली येथील नवोदित कवी असून ते विविध संस्थातर्फे अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत, तर संतोष कपाले हे रायगाव (तालूका – लोणार सरोवर, जिल्हा- बुलढाणा) येथील रहिवासी आहेत.आजवर त्यांनी शेती व निसर्ग या विषयांवर कवितांचे लेखन केलेले आहे. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

 दहाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने विलास जेंगठे, संजय बन्सल, मुर्लीधर खोटेले,कृष्णा कुंभारे ,संतोष  कपाले, गणेश रामदास निकम,चरणदास वैरागडे,  मनिषा हिडको,तुळशीराम उंदीरवाडे,पी.डी.काटकर, पुरुषोत्तम दहिकर,पुरुषोत्तम लेनगुरे,जयराम घोंगडे, प्रेमिला अलोणे,रेखा दिक्षित,माधुरी अमृतकर,वंदना मडावी,लता शेंद्रे,प्रशांत गणवीर,प्रभाकर दुर्गे,वसंत चापले, प्रतिभा सुर्याराव, बाबाजी व्ही.हुले,उपेंद्र रोहनकर,खुशाल म्हशाखेत्री,मिलींद खोब्रागडे,सुनील मंगर, सुजाता अवचट,स्वप्नील बांबोळे, ज्योत्स्ना बन्सोड इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!