Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीआठवीच्या विद्यार्थिनीने घरातच घेतला गळफास….

आठवीच्या विद्यार्थिनीने घरातच घेतला गळफास….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- कुटूंबियांनी रागावल्याने आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोली शहरातील वनश्री कॉलनीत शनिवारला सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटूंबियांना धक्का बसला आहे. आर्या भास्कर बांबोळे वय १५ वर्षे वनश्री कॉलनी गडचिरोली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,आर्या ही नवेगाव येथील नवजीवन पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठव्या वर्गात शिकत होती.शनिवारला आर्याच्या आईवडिलांनी तिला काही कारणासाठी रागावले.त्यामुळे नाराज झालेल्या आर्याने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.घटनेच्या वेळी आर्याचे वडिल नोकरीवर गेले होते तर आई आर्याच्या लहान भावाला शिकवणीतून आणण्यासाठी गेली होती.हीच संधी साधून आर्याने हे टोकाचे पाऊल उचलले.लहान मुलाला घेवून आई घरी येताच घटना उघडकीस आल्याने आईने एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!