- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.मराठी बोलता येत नसलेल्या चालकांना आज गुरुवारपासून नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे,प्रवाशांशी सुलभ संवाद साधता यावा व सुरळीत सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाने या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.संबंधित चालकांना सुरुवातीला एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठीचे ज्ञान नसल्यास चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास बॅज आणि परमिट रद्द करण्याची कारवाई केली जाईल,असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकविण्यासाठी कोंकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने गेल्या १०५ दिवसांपासून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार ६०० गैरमराठी चालकांनी प्रशिक्षण घेतले आहे.ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मश्री साहित्यिक मधु मंगेश कर्णिक,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की,१९८९ पासून व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य आहे.१२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या कायदेशीर व्यवस्थेच्या आधारे आता या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्देश परिवहन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- Advertisement -

