Friday, May 1, 2026
Homeनागपूरमोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी - नागपूर पोलीसांनी...

मोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी – नागपूर पोलीसांनी आरोपींना केली अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मागील महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर ६ अल्पवयीन मुलांसमवेत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.त्यानुसार यांना आरपीएफ आणि ‘बचपन बचाओ संस्थे’च्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.या प्रकरणात मानवी तस्करी करून ही सर्व मुले बिहारमधून आणल्याचे लोहमार्ग पोलिसांनी तपासादरम्यान उघड केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी शंभू आणि विकास नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या मुलांचे चाइल्ड लाइन टीमकडून समुपदेशन केले जाणार आहे.तसेच त्यांची कागदपत्रे तपासून त्यांचे नेमके वय जाणून घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

आरोपींनी मुलांच्या नातेवाईकांना भुरळ घालून सुरुवातीला ५०० ते १००० रुपये देऊन पेपर मिलमध्ये काम करण्यासाठी मुलांना नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी करण्यात आली व नंतर ही मुले अन्य टोळीतील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आली होती.मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना महिन्याला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवायचे व मुलां कडून मजुरीची कामे करवून घेतली जात होती.मुलांची तस्करी प्रकरणी मुख्य म्होरक्या कोण?याचा  पोलीस शोध घेत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!