Wednesday, June 10, 2026
Homeलातूरअखेर 'त्या' शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळून त्यांच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला होता.शेतीचा मुख्य आधारच हिरावल्याने गायकवाड कुटुंब अडचणीत आले होते.दुसरा बैल खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने त्यांनी पत्नीच्या मदतीने नांगरणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार,काशिनाथ यांच्या पत्नीने जबाबदारी स्वीकारून नांगराच्या एका बाजूला एक बैल तर एका बाजूला पत्नी औसाबाई नांगर ओढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र डागले होते.आता या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदतीचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जवळच्या गोशाळेतून शेतकऱ्याला नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने बैल खरेदी करता यावा यासाठी ३२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,शेतकरी काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर असून ते इतर  शेतकऱ्यांची जमीन कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यांना दोन मुले व चार मुली अशा सहा अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटली; दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटून दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार...

३० हजाराची लाच भोवली; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असतांनाच नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज,बुधवार १० जून रोजी धडक कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य...

घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर; ९९.४६ टक्के नोंदी पूर्ण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताच्या जनगणना-२०२७ अंतर्गत सध्या राज्यभर घर-यादी गणना मोहीम राबविण्यात येत आहे.१० जून २०२६ रोजीच्या आढावा अहवालानुसार राज्यात सरासरी १३.१७ टक्के घर-यादी...

पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होतांना दिसत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – प्रधानमंत्री यांच्या दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने केले अभिनंदन..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!