Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १४.४६ लाखांचा दंड वसूल..

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १४.४६ लाखांचा दंड वसूल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मागील पंधरा दिवसांपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.या कालावधीत एकूण ६१५ प्रकरणे नोंदवून संबंधितांकडून १४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत हेल्मेट न वापरणाऱ्या २२ वाहनचालकांवर, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्या १२ जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ७२ चालकांवर तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्या ६४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.याशिवाय वेग नियंत्रक नसलेल्या १२ वाहनांवर,ताडपत्रीविना मालवाहतूक करणाऱ्या २१ वाहनांवर,मागील सुरक्षा संरचना(आरयुपीडी)नसलेल्या ३५ तसेच बाजूची सुरक्षा संरचना(एलयुपीडी)नसलेल्या १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या १३ वाहनांवर,वैध परवाना नसलेल्या २७ चालकांवर,परावर्तिका नसलेल्या ८२ वाहनांवर तसेच धोकादायक ‘डॅझलिंग लाईट’ वापरणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या ७,नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्या ३७,मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७ तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करणाऱ्या १६ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.तसेच अतिभार वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर,अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १३ वाहनांवर,ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या १४ जणांवर तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. अग्निशामक यंत्रणा व फर्स्ट एड किट नसलेल्या २३ वाहनांवर तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा नसलेल्या १३ वाहनांवरही दंड आकारण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहन चालकांचे समुपदेशन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!