Saturday, May 9, 2026
Homeगडचिरोलीखरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम.. - धान,कापूस व सोयाबीन पिकांसाठी आधुनिक...

खरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम.. – धान,कापूस व सोयाबीन पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जागतिक हवामान बदल आणि संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम- २०२६ सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
संभाव्य कमी पाऊस,बदलते हवामान आणि उत्पादनातील जोखीम लक्षात घेऊन कृषी विभागाने धान,कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानावर भर दिला आहे. मोहिमेअंतर्गत गावनिहाय कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना लक्षांक निश्चित करून देण्यात आले असून ते पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक,तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध कृषी उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
धान पिकासाठी जैविक बीजप्रक्रिया,गादी वाफ्यावर पऱ्हे घेणे,पट्टा पद्धतीचा वापर,पऱ्हे टाकल्यानंतर २० ते ३० दिवसांत रोवणी करणे,रोवणीनंतर ३० दिवसांत ट्रायकोकार्डचा वापर,हिरवळीच्या खतांचा वापर, ॲझोला तंत्रज्ञान,खोडकिड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर तसेच डीएसआर,शून्य मशागत,ड्रम सीडिंग आणि श्री पद्धतीचा अवलंब यावर विशेष भर देण्यात येणार आहे.कापूस पिकासाठी उच्च घनतेची लागवड पद्धत (एचडीपीएस)अंतर्गत सरी-वरंबा पद्धतीने ९० बाय ३० सें.मी.अंतरावर लागवड,लागवडीवेळी खतांची मूलभूत मात्रा देणे,शेंडा खुडणी आणि ट्रायकोकार्डचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सोयाबीन पिकासाठी बीबीएफ सरी-वरंबा पद्धतीचा वापर,तुरीसह ४:१ आंतरपिक पद्धतीचा अवलंब तसेच ट्रायकोडर्मा आधारित बीजप्रक्रिया आणि बुरशीनाशकांचा वापर यावर भर दिला जाणार आहे.
मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभव प्रसिद्ध करून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
  • प्रिती हिरळकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गडचिरोली👇
खरीप हंगाम-२०२६ विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागास सहकार्य करून विविध प्रात्यक्षिके,तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले; शिक्षकाच्या मृत्यूने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काळाचा घाला किती निष्ठुर म्हणावा.ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले,अश्यांनी गुणवत्ता  सिद्ध केल्याने त्यांचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले आणि काही...

अन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी...

येत्या सोमवारपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.. – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा येत्या,सोमवार ११ मे...

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर जमीन.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!