Tuesday, June 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशातील संपूर्ण नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणू,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते.त्यानुसार पावले उचलण्यात आली.जे जंगल सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ इच्छितात,त्यांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल,असेही स्पष्ट केले होते.अश्यातच केंद्राने निश्चित केलेली मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवार २५ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांनी ३२ शस्त्रे आणि ५१५ काडतुसेसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.विशेष म्हणजे,आत्मसमर्पण करणारे सर्वजण छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर विभागातील असून, त्यांच्यामध्ये तेलंगणातील एकही व्यक्ती नाही. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये वरिष्ठ नेते,हेमला ऐतू ऊर्फ विज्ञा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्या आणि दक्षिण बस्तर डिव्हिजनल कमिटीचे प्रभारी पोडियम लाचू उर्फ मनोज,डिव्हिजनल कमिटी सदस्य आणि(गुरुला आर्मी पीएलजीए)मधील प्लाटून कमांडर या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.या सर्व नक्षलवाद्यांनी तेलंगणाचे पोलीस महासंचालक(डीजीपी)बी.शिवधर रेड्डी यांच्यासमोर हैदराबाद येथे आत्मसमर्पण केले. तेलंगणा सरकारच्या पुनर्वसन धोरणाने प्रभावित होऊन आणि पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण करणाऱ्यांना १.२० कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज,केंद्र सरकारचे प्रोत्साहन आणि मोफत आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!