Wednesday, June 24, 2026
Homeनांदेडचार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नांदेड शहराच्या हारूनबाग परिसरात घडली.घटनेने नांदेड शहरात शोककळा पसरली असून मृतक चिमुकल्यांच्या कुटुंबीयांनी काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश केला.मोहम्मद अली वय १३ वर्षे, सय्यद फूरखान वय १३ वर्षे,मोहम्मद अदनान वय १० वर्षे आणि मोहम्मद रेहान वय ११ वर्षे,अशी मृत मुलांची नावे असून चौघेही नांदेड शहराच्या इस्लामपूरा भागातील आहेत.यातील फूरखान आणि रेहान हे दोघे सख्खे भाऊ होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. जवळच काठावर मुलांचे शालेय गणवेश,जुते आणि चपला आढळून आल्या,तेव्हा या दुर्घटनेची भीषणता समोर आली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे,इतवारा पोलीस ठाण्याचे  अधिकारी व जीवरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले.चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.हारुनबाग परिसरात नाल्याचे काम सुरू आहे.तिथे मोठ-मोठे खड्डे पडून पाणी साचले असल्याने उन्हाचा तडाखा किंवा खेळण्याच्या ओघात शाळकरी मुले आंघोळ वा पोहण्याच्या उद्देशाने त्या पाण्यात उतरली असावी.मात्र,खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाणी अतिशय खोल असल्याने चारही मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!