- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विद्यार्थी,विवाहित पुरुष-महिला,प्रियकर-प्रेयसी व अनेकजण स्वतःला गळफास लावून भगवंताने दिलेले अमूल्य जीवन क्षुल्लकशा कारणासाठी संपवत असल्याच्या घटना विविध ठिकाणी उघडकीस येऊ लागल्या आहेत.कुणी नैराश्यात,तर कुणी संतापाच्या भरात,तर कुणी रोजच्या किटकिटी पायी टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे आज,रविवार १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या लाडीकर ले-आऊट परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अर्श नरेश बांते वय १८ वर्षे,रा.मंगलधाम सोसायटी,लाडीकर ले-आऊट,नागपूर असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बीसीएच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.विशेष म्हणजे,अर्शने चालू शैक्षणिक वर्षात बीसीए अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.पहिल्या सेमिस्टरला(पहिले सत्र)तो अनुत्तीर्ण झाला.त्यामुळे तो तणावात होता.काल शनिवारच्या रात्री जेवण केल्यावर तो आपल्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर आज सकाळी उशीर झाल्यावरही अर्श खोलीच्या बाहेर न आल्याने त्याच्या आईने दार ठोठावून त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र,प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर,दार तोडून आत गेले असता,अर्शने पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.त्याला खाली उतरवून उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. याबाबत हुडकेश्वर पोलिसांना सूचना मिळताच,त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
- Advertisement -

