Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आले आहे.आईच्या निधनानंतर वडिलाने दुसरे लग्न करू नये म्हणून चक्क १९ वर्षीय पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना पोलीस तपासात समोर आली आहे.विशेष म्हणजे, वडिलाचा आज विवाह होणार होता आणि विवाहाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.दिलीप धुराजी राजगुरू वय ४५ वर्षे,रा.रुई,ता.अंबड,जि.जालना असे मृतक वडिलाचे नाव आहे,तर मुलगा विलास(विशाल) दिलीप राजगुरू वय १९ वर्षे व त्याचा १७ वर्षीय सहकारी मित्र अशी आरोपींची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील रुई गावात आज सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.सदरची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचे आढळून आले,त्यामुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.दिलीप राजगुरू यांचा मुलगा विलास राजगुरू यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीने  हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. विलासच्या आईचे म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते.त्यानंतर,ते एकटेच राहत होते. दरम्यान,त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता.वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.विलासने राग मनात धरून आपल्या एका मित्राच्या मदतीने वडिलांच्या हत्येचा कट रचला.आज सकाळच्या सुमारास संधी साधून विलासने वडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले,यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती,त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे.प्रकरणाचा पुढील तपास तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या एपीआय वैशाली पवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!