- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील एसबीएल कंपनीत काल,रविवार १ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या तब्बल १९ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अद्याप २३ जण जखमी असून यात १३ जण ७० टक्के भाजल्याने गंभीर जखमी आहेत.अश्यातच आज,सोमवार २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे.यात मृतांच्या वारसांना कंपनीकडून ७५ लाख रुपये,राज्य सरकारकडून ५ लाख रुपये तर केंद्र सरकारकडून २ लाख रुपये असे एकूण ८२ लाख रुपये मदत दिली जाईल.तर जखमींना २५ लाख रुपये दिले जाणार आहेत.याशिवाय जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल.त्यातच,जोपर्यंत एसबीएल कंपनी जोपर्यंत बंद राहील तोपर्यंत कामगारांना वेतन देण्यात येईल.कंपनी परत सुरू झाल्यानंतर त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,असे बावनकुळे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
- Advertisement -

