Thursday, April 30, 2026
Homeनागपूरकंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी ८२ लाख रुपये..

कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी ८२ लाख रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील एसबीएल कंपनीत काल,रविवार १ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या तब्बल १९ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अद्याप २३ जण जखमी असून यात १३ जण ७० टक्के भाजल्याने गंभीर जखमी आहेत.अश्यातच आज,सोमवार २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे.यात मृतांच्या वारसांना कंपनीकडून ७५ लाख रुपये,राज्य सरकारकडून ५ लाख रुपये तर केंद्र सरकारकडून २ लाख रुपये असे एकूण ८२ लाख रुपये मदत दिली जाईल.तर जखमींना २५ लाख रुपये दिले जाणार आहेत.याशिवाय जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल.त्यातच,जोपर्यंत एसबीएल कंपनी जोपर्यंत बंद राहील तोपर्यंत कामगारांना वेतन देण्यात येईल.कंपनी परत सुरू झाल्यानंतर त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई  केली जाईल,असे बावनकुळे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!