उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र जमीन महसूलच्या प्रचलित पद्धतीनुसार सुनावणीची नोटीस ही प्रत्यक्ष हस्तपोच किंवा पोस्टाद्वारे पाठवली जायची.यात नोटीस न मिळणे, पत्ता न सापडणे किंवा नोटीस स्वीकारण्यास नकार देणे अशा तांत्रिक कारणांमुळे जमीन महसूल प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडत होती.आता,कलम २३० मध्ये सुधारणा झाल्यामुळे अधिकृत ईमेल आयडीवर पाठवलेली नोटीस ही कायदेशीररीत्या बजावण्यात आली आहे,असे मानले जाईल.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलमांत सुधारणा करून आता पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेल(ई-मेल)द्वारे नोटीस बजावणे कायदेशीर ठरवण्यात आले आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या या प्रस्तावास आज,मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.विशेष म्हणजे,राज्यात जमिनीशी संबंधित साधारणतः १२ हजार प्रकरणे मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत.अनेकदा केवळ नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेतच महिन्यांचा कालावधी जातो.या निर्णयामुळे वेळेची बचत होईल.टपाल किंवा प्रत्यक्ष नोटीस बजावण्याचा वेळ वाचणार आहे.प्रक्रियेत पारदर्शकता येईल.ईमेल पाठवल्याचा तांत्रिक पुरावा उपलब्ध राहत असल्याने ‘नोटीस मिळाली नाही’ ही सबब सांगता येणार नाही.नोटीस वेळेवर पोहोचल्याने सुनावणीच्या तारखा वारंवार पुढे ढकलाव्या लागणार नाहीत,परिणामी सामान्य नागरिकांना जलद न्याय मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
आता जमीन महसूल संबंधातील प्रकरणात ई-मेलद्वारे नोटीस बजावणे कायदेशीर..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

